सांगली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा जिंकणारच असा दावा करणारे भाजपाचे जेष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत पवारांना बारामतीत अडकवून तिथेच पिंगा घालायला लावला आणि आम्ही पवारांचे बालेकिल्ले उध्वस्त केले अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उधवस्थ केले. लोकसभेत आम्ही पवारांना जेरीस आणले पण थोडक्यात वाचले. पवारांना बारामतीतच अडकवून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला आणि त्यांचे सर्व बालेकिल्ले आम्ही उधवस्थ केले असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. काँग्रेसवर टीका करताना पाटील म्हणाले कि, काँग्रेसने भाजप हा ब्राह्मणाचा पक्ष असल्याचे लोकांच्या मनात बिंबवले आणि बहुजन समजाला भाजपासून दूर ठेवले. हेच काम वर्षानुवर्षे काँगेसने केले असल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सांगलीच्या कवठेपिराण गावात हिंद केसरी मारुती माने यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आदर्श सरपंच भीमराव माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.