मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज (१८ जून) विधीमंडळात सादर करण्यात आला ,आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, सरकारने अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करुन विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यात ओबीसींंसाठी भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत.
ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्याकरिता २०० कोटी रुपये देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. या योजनेंतर्गतओबीसी मुला- १८ आणि मुलींसाठी १८ अशी एकूण ३६ वसतीगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात आहे. संजय गांधी अन् श्रावणबाळ योजनेचे मानधन ६०० वरून १००० रुपये करण्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. धनगर समाजाच्या कल्याणासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आदिवासी विभागाच्या बजेटला धक्का लागणार नसून स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १००० हजार घरकूल बांधून देणार असून अन्य काही विशेष सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हंटले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या महिला कल्याणासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद मालेगाव येथे आयटीआय सुरू करणार आहे.