मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्रातील पुढील महिन्यातील संभाव्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेसोबतच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर संस्पेंस ठेवला आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर यावर चर्चा करण्याची पक्षाची योजना आहे. 100 हून जागा भाजपाला मित्रपक्षांना द्यायच्या नाहीत. हेच कारण आहे की शिवसेनेकडून यासंदर्भात बैठक घेण्याचा प्रस्ताव भाजप वारंवार टाळत आहे.
शिवसेनेशी संबंधित सूत्रांचा दावा आहे की, लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेसाठी अर्ध्या अर्ध्या जागांवर लढण्यासाठी भाजपाची सहमती होती. गेल्या महिन्याभरात शिवसेनेने जागावाटपाच्या बैठकीसाठी तीनवेळा अनौपचारिक प्रस्ताव दिला आहे. भाजपाने याचे कोणतेही उत्तर दिलेले नाही.
भाजपाच्या सूत्रांनुसार, 288 जागांपैकी जास्तीत जास्त 100 जागा शिवसेनेला देण्याची पक्षाची योजना आहे. भाजपा सुरुवातीला शिवसेनेपुढे यापेक्षाही कमी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. लोकसभा निवडणुकीचा परिणाम आणि त्यानंतर करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेनंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तळागाळातील अनेक दिग्गज नेते भाजपात दाखल झाले. त्यामुळे शिवसेनेला निम्म्या जागा देण्याचा प्रश्नच नाही.