बहुजननामा ऑनलाईन टीम : अवघ्या १० दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. तरी अजूनही उमेदवारीसंदर्भात अनेक पक्षांत गोंधळ आहे. त्यात भाजपने पक्षातील अनेक बड्या नेत्यांना उमेदवारी नाकारून पक्षात आलेल्यांना संधी दिली आहे. ज्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरीचे प्रमाण दिसून आले होते. मात्र भाजप ते बंड योग्यपद्धतीने थंड करण्यास यशस्वी ठरली. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या दिग्गज नेत्याचा पत्ता कट केला आहे.
मात्र विनोद तावडे यांचं तिकीट नाकारूनही सगळं विसरून ते भाजपच्या प्रचाराला लागले आहेत. परंतु अजूनही आपलं तिकीट नाकारण्यामागचं कारण तावडे यांना समजलं नाही. यावेळी सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या प्रचारासाठी आले असता विनोद तावडेंनी ही खंत व्यक्त केली. विनोद तावडे आणि प्रवीण दरेकर वैभववाडी तालुक्यात भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले होते त्यावेळी त्यांनी नितेश यांना बहुमत देत विजयी करण्याचं आवाहन केलं. मात्र तावडे यांचं गाव असूनदेखील त्यांना उमेदवारी न दिल्याने स्थानिक भाजप नेत्यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी ही खंत व्यक्त करत आपलं तिकीट का नाकारलं याचा शोध घेत आहेत. यावेळी आपण बोरीवलीत कशी माणसं जोडली हे उदाहरणं ते सर्वांना सांगत सुटले आहेत.
आपण पक्षासाठी एवढी काम करूनही आपलं तिकीट का आणि कोणी आणि कसं कापलं असेल या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळत नाहीयेत. परंतु तरीही विनोद तावडे नितेश राणेना जिंकून देण्यासाठी त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. महत्वाची बाब म्हणजे भाजपनेही तावडेंवरच सेनेच्या विरोधात नितेश राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे भाजपचं शिस्तबद्ध राजकारण यालाच म्हटलं जात असावं.
Visit : bahujannama.com