Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी (Alibag MLA Mahendra Dalvi), खालापुरचे आमदार महेंद्र थोरवे (Khalapur MLA Mahendra Thorve) यांच्या वतीने महाडचे आमदार भरत गोगावले (Mahad MLA Bharat Gogavale) यांनी पालकमंत्री हटावचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पालकमंत्री आदिती तटकरे या मनमानी करीत असल्याचा आरोप गोगावले यांनी केला आहे.
विविध विकास कामांचे श्रेय घेण्यापासून नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीदरम्यान (Nagar Panchayat Election) राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचे सांगत पालकमंत्री कोणीही चालेल परंतु आदिती तटकरे नको असा पवित्रा गोगावले यांनी रायगड शिवसेनेच्या (Raigad Shiv Sena) वतीने घेतला आहे. त्यामुळे बीड प्रमाणेच रायगड मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद पेटला आहे.
बीडमध्ये आघाडीत बिघाडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मात्र, याला अपवाद बीड आहे. शिवसेनेने केलेल्या विकास कामावर डल्ला मारण्याचे काम स्थानिक आमदार करत आहेत. तसेच विकास कामात खोडा घालण्याचे काम देखील आमदार करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता.
Web Title :- Maha Vikas Aghadi | shiv sena mlas demand removal of raigad guardian minister aditi tatkare
Pune Crime | पहाटे मेडिकल दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडले; कोंढव्यातील घटना