नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Madras High Court | नवीन कार खरेदी करताना ५ वर्षांचा विमा बंधनकारक केल्याने वाहनांच्या किमतीत ५० हजार ते दोन लाखापर्यंत वाढ झाली होती. आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीवर न्यायालयाने सूचना मागविल्या होत्या. वाहन कंपन्या, वाहन नियामक इरडासह (insurance regulatory and development authority of india – IRDA) अनेक संस्थांनी या निर्णयाला विरोध केला होता. मात्र उच्च न्यायालयाने (Madras High Court) निवाड्यात दुरुस्ती केली असून नवीन कार खरेदी करताना आता पाच वर्षाचा विमा बंधनकारक नसल्याचा नवा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कार खरेदीदारांसह वाहन उत्पादक कंपन्या आणि वितरकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) ४ ऑगस्ट रोजी एका निवाड्यात कार खरेदी करतेवेळीच सलग ५ वर्षांचा विमा घेणे बंधनकारक करण्याची अट घातली होती. वाहन कंपन्या, वाहन नियामक इरडासह अनेक संस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सूचना मागवल्या होत्या. सामान्य विमा कंपन्या, वाहन उत्पादक कंपन्या आणि विमा एजंटांच्या संघटना यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आदेशात सुधारणा केली. दरम्यान, प्रवाशांची सुरक्षा हाच आपला केवळ उद्देश आहे. केवळ सल्ला म्हणून आता जुन्या निवाड्यातील आदेश आता व निवाड्यात त्यानुसार बदल केले जातील, तसेच यासंबंधी कायदा बनविण्याचा निर्णय संसदेवर सोपविला जाईल, असे न्यायालयाने नमूद केले.
Web Title : Madras High Court | madras hc directs there no compulsion take five years insurance car purchase.
Gold Price Update | सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या आता किती रूपयांना मिळतंय 1 तोळा सोने