मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ रविवारी सागर जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘मोदीजी लक्ष हटवण्यासाठी कधी राष्ट्रवाद कधी पाकिस्तानच्या गोष्टी करतील. पण तरुणांबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल एक अवाक्षरही काढणार नाहीत. तोंड चालणे आणि देश चालवणे यात बराच फरक असतो,’ असे ते म्हणाले आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत प्रचारादरम्यान मोदीवर विधान करत ते आता भाषण करत फिरत असून अजून सहा महिन्यांनी पंतप्रधानांना घराबाहेर पडत येणार नाही. कारण देशातील युवक त्यांना जाब विचारतील आणि त्यांना रोजगाराच्या मुद्द्यावरून काठीने बदडून काढतील, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून लोकसभेत गोंधळ उडाला होता.
नंतर मोदींनी राहुल यांना ट्यूबलाईट म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. इतकेच नाही तर त्यांनी पंडित नेहरूंवरही भाष्य केले होते. कोणाला तरी पंतप्रधान व्हायचे होते म्हणून देशाची फाळणी करण्यात आली, असे ते म्हणाले. याही विधानावरून जोरदार वाद सुरु झाला आहे.