बहुजननामा ऑनलाईन – बीजेपीच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोशल मीडियावरही राजकारण, मनोरंजन, क्रिडा आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांच्या सुषमा यांच्या पतीने त्यांना लिहलेलं पत्र व्हायरल झाले आहे. दरम्यान सुषमा यांनी त्यांच्या तब्बेतीच्या कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देत सक्रीय राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांचे पती स्वराज कौशल यांनी त्यांच्यासाठी पत्र लिहिले होते. त्यांनी पत्रामध्ये नेमकं काय लिहल ते आपण पाहूया.
तब्बेतीच्या काळजीमुळे या पुढे निवडणुक न लढण्याचा सुषमा यांनी या निर्णयाचे स्वागत करत स्वराज कौशल यांनी या निर्णयासाठी सुषमा यांचे आभार मानले आहे. “मिल्खा सिंग यांनीही यापुढे धावायचे नाही. असा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची मला आज आठवण झाली. तुझी राजकीय मॅरेथॉन स्पर्धा १९७७ पासून सुरु झाली. दरम्यान तू ११ निवडणुका लढलीस. त्यात अपवाद होता तो फक्त १९९१ आणि २००४ च्या निवडणुकांचा जेव्हा पक्षाने तुला निवडणुक लढू दिली नव्हती. लोकसभेत ४ वेळा, राज्यसभेत ३ वेळा आणि विधानसभेमध्ये ३ वेळा निवडून आलीस. तू वयाच्या २५ व्या वर्षापासून निवडणुका लढत आहेस. ही तुझ्यासाठी एक प्रकारची मॅरेथॉनच झाली.
राजकारणातून निवृत्ती घेणाऱ्या पत्नीला स्वराज यांनी अशा प्रकारे राजकारणाचा प्रवास घडवला. या राजकारणाच्या मॅरेथॉनच्या सर्व प्रवासाचा संदर्भ देत स्वराज कौशल यांनी पत्राच्या शेवटी २ मुद्दे मांडले. या पत्राच्या शेवटी स्वराज कौशल म्हणाले होते की, मॅडम मागील ४६ वर्षांपासून मी तुमच्या मागे धावत आहे. मी आता १९ वर्षांचा राहिलो नाही. मला आता दम लागत आहे. धन्यवाद…! असे भावनिक पत्र स्वराज कौशिक यांनी सुषमा यांना लिहले. दरम्यान ते कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १३ जुलै १९७५ रोजी त्यांनी लग्न केले.