बहुजननामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोना व्हायरसचा वेग वाढला असल्यामुळे 3 मेपर्यंत लॉकउाउन वाढविण्यात आल्याची घोषणा पंतपृधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही. पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनपेक्षाही जास्त कडकरित्या लॉकडाउन राबविण्यात येणार आहे.
लॉकडाउन कालखंडात नागरिकांना सोशल डिसटन्स पाळले असल्यामुळे कोरोना देशात कमी पसरत आहे. देशातील सर्व नागरिकांनी कोरोनाच्या लढ्यात पुढाकार घेतला असल्यामुळे आपण कोरोनाच वेग कमी करीत आहोत. नागरिकांनी 20 एपिृलपासून लॉकडाउन कडक पाळायचे आहे. त्या कालखंडात घराबाहेर न पडता देशवासियांना मदत करायची आहे.
लॉकडाउनमध्ये गरीब नागरिकांना मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. दरम्यान, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. आंबेडकरांच्या संविधानानुसार आपण पुढे जाउया असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे