मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने यापुर्वीच राज्यात सर्वत्र 15 मे पर्यंत कडक निर्बंध घातले होते. तरी देखील आढळून येणार्या कोरोनाच्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. त्यामुळं कुठलाही धोका न पत्कारता आणखी 15 दिवस म्हणजेच राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात यावा असे आज (बुधवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले (सर्व मंत्र्यांचा कल) असून त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार आहेत. त्याबाबतच सविस्तर नोटिफिकेशन काढून काय चालू आणि काय बंद असेल हे सांगण्यात येईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
At the Cabinet meeting, the health department & ministers proposed to extend the lockdown for 15 days. The chief minister will take a final decision on this matter: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/tjIEQZ8YLg
— ANI (@ANI) May 12, 2021
देशात इतर ठिकाणी देखील कोरोनाची रूग्ण संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यातील रूग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाल्याचे पहावयास मिळाले असले तरी म्हणावे तेवढी रूग्ण संख्या घटलेली नाही. सध्या कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील कोरोनाची रूग्ण संख्या वाढत आहे. काही ठिकाणी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई येथे कोरोनाचा प्रादुर्भाव अंशतः कमी झाला आहे. मात्र, अजुनही काही प्रमाणावर कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. सर्व गोष्टींचा विचार करून मंत्रिमंडळाने आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात यावा असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं (सर्व मंत्र्यांचा कल) असून त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.