नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने पुन्हा एकदा वेग पकडला आहे. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, तमिळनाडु, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये लागोपाठ वाढ नोंदली जात आहे. रोज नोंदले जाणारे आकडे पुन्हा एकदा 20 हजाराच्या पुढे गेले आहेत. आतापर्यंत देशातील 20 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाऊनची घोषणा झाली आहे.
या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणारी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत असताना महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातमध्ये लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू सारखे प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणखी काही कठोर प्रतिबंधावर चर्चा होऊ शकते. म्हणजे आणखी काही भागात लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू सारखे प्रतिबंध लावले जाऊ शकतात. मात्र, याचा निर्णय आजच्या बैठकीनंतर होईल.
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाची 17, 864 नवी प्रकरणे नोंदली गेली आणि या दरम्यान 87 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात मागील काही दिवसात कोरोनाचे आकडे 15 हजारपेक्षा जास्त येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना इशारा सुद्धा दिला आहे की, जर प्रकरणे अशीच वाढत राहिली तर संपूर्ण लॉकडाऊनशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. त्यांनी म्हटले होते की, आम्हाला लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही परंतु यासाठी प्रवृत्त करू नका.