बहुजननामा ऑनलाइन टीम – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad)यांनी शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचं यावेळी सांगितलं. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात असंही गायकवाड यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी, अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी विचारविनिमय करूनच त्यांचे आरोग्य विशेषांक हे जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्य जपण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वर्ग सुरू झाले आहेत तरी ऑनलाइन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. तसंच, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात बोलताना म्हणाल्या.