नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे सरकार लवकरच कर्जमाफी देणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण केली जाईल. यासाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. ठाकरे सरकारवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधकांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बैठकही झाली होती.
आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचं पवारांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे.
Visit : bahujannama.com