पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आजच्या युगात मानवी मूल्ये जपली गेली, तरच मानवी संस्कृती टिकेल, साहित्यातून ही मानवी मूल्ये आपल्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य कवी, लेखक, साहित्यिक करतात,आज मराठी भाषा आणि शाळांची स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. मराठी भाषा टिकली तर मराठी शाळा राहतील भविष्यातील वाचक निर्माण होईल. वाचकच नसेल तर मराठी साहित्यही लिहिले जाणार नाही.आताच पुस्तकांचा वाचक कमी होतोय मराठी भाषेला चांगले दिवस आणून अत्रेचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
सरकारवर नियंत्रण ठेवणारा दबाव गट नसल्याने अजून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. आजच्या परिस्थितीला समाजमध्ये बोलके समाजसुधारक खूप आहेत. मात्र अत्रे हे कर्ते समाजसुधारक होते. जोपर्यंत बोलके आणि कर्ते साहित्यिक एकत्र येत नाही. तो पर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही. अत्रेंच्या काळातील लोक विवेकी होते. आजची मराठी मानसिकता ही खुरट्या झुडुपासारखी आहे.
आचार्य अत्रे स्मृती अर्ध शताब्दी सोहळ्यात अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अनिल अवचट, मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील प्रतिमा परदेशी, विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद लुलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.