नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलआयसीची जीवन शांती स्कीमची खासियत आहे कि त्यात मिळणारी पेन्शन. ही स्कीम ग्राहकांना पेन्शनद्वारे भविष्याची सुरक्षा प्रदान करते. जर ५० वर्षाची व्यक्तीने १८,००० रु. पॉलिसीमध्ये लावले तर त्याला लगेच ६५,००० वर्षाला पेन्शन मिळते. पण यासह काही अटीही आहेत. या प्लॅनच्या लाँचच्या निमित्ताने एलआयसीचे अध्यक्ष वी.के. शर्मा यांनी सांगितले की, ही जीवन शांती योजना एक नॉन-लिंक्ड प्लॅन आहे. सोबतच ही एकल प्रीमियम वार्षिक योजना असून ज्यात विमा धारकांना तात्काळ वार्षिक किंवा स्थगित वार्षिक निवडण्याचा पर्याय आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करा पॉलिसी
या योजनेला तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करू शकता. एलआयसीची जीवन शांती एक व्यापक वार्षिक योजना असून त्यात व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबालाही लाभ होतो.
पॉलिसीची वैशिष्ट्ये –
एलआयसीचे एजेंट राजेश कुमार त्यागी यांच्या मतानुसार ‘जीवन शांती’ एक अप्रतिम प्रोडक्ट आहे. ही एकल प्रीमियम डिपॉजिट पेन्शन प्लॅन आहे.
लोनची सुविधा
३ महिन्यांनंतर कोणतेही वैद्यकीय कागदपत्र सरेंडर
त्वरित किंवा कधीही १ ते २० वर्षांच्या दरम्यान पेन्शनची सुरुवात
संयुक्त जीवनात तुम्ही कोणत्याही जवळच्या नातेवाईकाचा समावेश करू शकता.
त्वरित पेन्शन जवळजवळ जीवन अक्षय VI च्य बरोबर
५ वर्ष ते २० वर्षांच्या दरम्यान ९.१८ टक्के ते १९.२३ टक्के पर्यंत आजीवन हमी.
आयकरमध्ये सूट
जर ५० वर्षाची व्यक्तीने १०,१८,००० रु. पॉलिसीमध्ये लावले तर त्याला लगेच ६५,००० वर्षाला पेन्शन मिळते. पण Deffered पर्यायांतर्गत त्याला खालील रक्कम मिळेल.
१ वर्षानंतर- ६९३०० वार्षिक
५ वर्षांनंतर- ९१८०० वार्षिक
१० वर्षांनंतर – १२८३०० वार्षिक
१५ वर्षांनंतर – १६९५०० वार्षिक
२० वर्षांनंतर – १९२३००वार्षिक
या वर्षाच्या लोकांना होऊ शकतो फायदा
एलआयसीच्या या योजना किमान ३० वर्षे आणि जास्तीत जास्त ८५ वर्षापर्यंतची व्यक्ती घेऊ शकते. जीवन शांती प्लॅनमध्ये कर्ज, पेन्शन सुरु झाल्याच्या एका वर्षानंतर आणि सरेंडरनंतर पेन्शन सुरु होण्याच्या ३ महिन्यानंतर दिले जाऊ शकते.