बहुजननामा ऑनलाईन टीम : भारतीय आयुर्विमा कंपनी ही सर्वात लोकप्रीय आणि विश्वासू कंपनी आहे. एलआयसी विविध प्रकारच्या पॉलिसी देते. एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवून तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता. आम्ही तुम्हाला अशाच एका पॉलिसी बद्दल सांगणार जिच्यात पैसे लावून तुम्ही थेट जास्त पैसे कमावू शकता.
एलआयसीच्या ज्या स्कीमबद्दल आम्ही बोलत आहोत तिचे नाव जीवन उमंग आहे. विशेष म्हणजे या योजनेत तिन महिन्यांच्या बाळापासून 55 वर्षांच्या लोकांपर्यंत सर्वजण पैसे गुंतवू शकतात. या पॉलिसीमध्ये 100 वर्षांपर्यंत वीमा संरक्षण मिळते. पॉलिसी होल्डरच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला याची सर्व रक्कम मिळते. पॉलिसीमध्ये 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आणि 30 वर्षापर्यंतचे पर्याय असतात. यापैकी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. यामध्ये तुम्हाला आयुष्यभरासाठी वीमा संरक्षण आठ टक्के रिटर्न मिळते. या योजनेत तुम्ही 1302 रुपये जमा केल्यास तुम्हाला वार्षिक प्रीमियम 15,298 रुपये असेल.
पॉलिसीमध्ये 30 वर्षांच्या कालावधीसाठी तुम्हाला सुमारे 4 लाख 58,940 रुपये जमा करावे लागतील. याच्या एक वर्षानंतर तुम्हाला याचे रिटर्न चाळीस हजार रुपये मिळतील. जर तुम्ही 100 वर्ष पूर्ण होण्याचा हिशेब केल्यास या पॉलिसीमध्ये तुमची एकुण रक्कम 40 लाख रुपये जमा होते. यासोबत तुम्हाला 28 लाख रुपयांचा रिटर्न मिळतो. जर व्यक्तीचे वय 101 वर्ष झाले तर त्यास 62.95 लाख म्हणजे सुमारे 63 लाख रुपये वेगळे मिळतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही बँक किंवा एलआयसीच्या कोणत्याही एजन्टशी संपर्क साधू शकता.
Visit : bahujannama.com