नवी दिल्ली : वृत्तसंथा – जर आपल्या LIC पॉलिसीला २ वर्षांहून अधिक काळ लोटला असेल तर आता आपण हे सहजपणे पुनरुज्जीवित करू शकता. भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) यासंदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले की, ती जुन्या पॉलिसीला पुनरुज्जीवित करण्याची संधी देत आहे जर पारंपारिक नॉन-लिंक्ड पॉलिसी असेल तर त्यासाठी ५ वर्षांची मर्यादा दिली जाईल. पॉलिसीचा प्रीमियम ठरवलेल्या कालावधीत भरला नाही तर ती पॉलिसी लैप्स होऊन जाते. सामान्यत: पॉलिसीधारकास प्रीमियम जमा करून पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी दिला आहे.
दरम्यान १ जानेवारी २०१४ पासून आयआरडीए प्रॉडक्ट रेग्युलेशन २०१३ लागू केले गेले. यानंतर, पहिल्यांदा पैसे न भरल्यापासून २ वर्षांचा पुनरुज्जीवन कालावधी होता. अशा परिस्थितीत जर पॉलिसीधारकाने १ जानेवारी २०१४ नंतर एलआयसी पॉलिसी विकत घेतला असेल तर ते ५ वर्षांच्या आत त्यांचे नॉन-लिंक्ड पॉलिसी पुनरुज्जीवित करू शकणार नाहीत.
एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक विपिन आनंद यांनी सांगितले की, जीवन विमा खरेदी करण्याचा निर्णय हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. दुर्दैवाने, कधीकधी परिस्थितीमुळे प्रीमियम आणि पॉलिसी भरणे शक्य होत नाही. नवीन पॉलिसी घेण्यापेक्षा जुन्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करणे हा एक चांगला निर्णय आहे.