बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना रुग्णांसाठी तुम्ही शाळा क्वारंटाईन सेंटर म्हणून उभारल्या. शाळेमध्ये आम्हाला आमचा मार्ग सापडतो. तिथेच तुम्ही कोरोना पेंशट ठेवता. पण आम्ही विद्यार्थी काय बोलणार ना कारण मोठी माणस जे करतात ते योग्य असते म्हणून गप्प बसलो आहे. कोरोना पेशंट शाळेत ठेवले. म्हणून पालकांनी शाळा उघडंयास नकार दिला. ऑनलाईन क्लासमुळे अडथळे येत असल्याने शाळा उघडणे योग्य आहे. शाळेची घंटा आजची साथ देते. की या मुलांनो या!! खरच रे देवा कोरोना जाऊ दे, शाळेची घंटा वाजू दे अशी आर्त हाक गरिब-मध्यम कुटुंबातील मुलांकडून केल जात आहे. विठ्ठला पाडुरंगा अरे येऊ दे तुला जाग.
काळोखानंतर 11 मार्च 2020 रोजी काळा दिवस उजाडला आणि सारी सृष्टीच अंधकारमय झाली. गडद अंधारात वसुंधरासुध्दा अंधकारमय झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू केला. त्यानंतर 22 मार्चपासून २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर वाढता वाढता २१ दिवसांचे आता सहा महिने झाले. आजचा ८ तारखेचा १७२ वा दिवस आहे. आम्ही विद्यार्थी शाळेपासून वंचित आहोत. कायम वाट बघायची की दुसरे सत्र कधी येतेय. कधी परीक्षा होती. आणि कधी उन्हाळ्याची सुट्टी लागेल, असे नेहमी वाटायचे. यावर्षी परीक्षासुध्दा झाल्या नाही. सुरुवातीला वाटले २१ दिवसांनंतर सुरळीत होईल. मात्र, सहा महिने झाले तरी कोरोना पाठ सोडत नाही. त्यामुळे आता स्वतः सुरक्षित राहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा.
महामारीने देश नव्हे तर जग व्यापले आहे. शाळा, कॉलेज, कंपनी, शासकीय, खासगी कार्यालये इतकेच नव्हे तर छोट्या गल्लीपासून मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडे कोरोनाची भीती वाढत आहे. “संत तुकाराम महाराज म्हणतात… मानवातच देव आहे “खरच त्यांचे म्हणणे आता पटत आहे. पोलीस, सफाई कर्मचारी, अग्निशामक दल, डॉक्टर, नर्स स्वतःबरोबर कुटुंबीयांची चिंता न करता कोरोनाशी दोन हात करीत आहेत. त्यांच्यातच देव आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चिमुकलही चार महिने कुठलाही हट्ट न करता, काही न मागता यांनी घरीच शहाणपणाने दिवस घालवले. मुलांसोबत झालेली ताटातुट आता सहन होत नाही.
चौकट
शाळा-महाविद्यालय परिसरात शुकशुकाट
आता शाळेचा वर्ग आणि परिसर एकेकाळी मुलांच्या आवाजानी, उड्या मारण्यानी, गोंगाटानी गजबजायचा तो आता आवाज शांत झाला आणि शुकशुकाट पसरला आहे. मैदानावर खेळणे, बागडणे, उड्या मारणे आता नाही. तास सुरू असताना हळुहळू आवाज कुजबुजने नाही, चोरुन डबा खाणे, दंगा-मस्ती नाही. काहीच कानावर येत नाही. प्रार्थनेसाठी झालेली शाळेची पहिली घंटा नाही. मधल्या सुट्टीत मिळालेला खाऊ सगळ सगळ आढवतय.
चौकट
वैताग आणलाय नेटवर्क
शासनाने नियम-अटी घालून काही प्रमाणात हॉटेल, मॉल, सिनेमागृह, शूटिंग, प्रवास सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये शाळेचाही समाविष्ट करायला पाहिजे. आम्ही नियमांचे पालन करू. कोणी एकेकाळी शाळेत बंदी असलेला ” मोबाईल ” शाळा चालवू लागला. ऑनलाईन क्लासेस सुरु झाले. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ऑनलाईन क्लासेस पसंत केले. पण पावसाळा येताच नेटवर्क नाही, आवाज येत नाही, कॉल कट होणे अशा अनेक समस्या एवढ्याश्या बद्धिला काहीच समजेना. दादा, ताई कडून शिकावे, समजून घ्यावे तर त्यांना त्यांची कामे. ऑनलाईन जमेना काय चाललय ते कळेना. ऑनलाईन शिक्षण सुरुवातीला छान वाटल पण काहीच कळत नाही. कधी शिक्षक गुंततो तर कधी मुलगा तोंड आ करुन गुंततो. वैताग आणलाय नेटवर्कनी.
– प्रतिक्षा सीताराम धोंडगे.
इयत्ता 10 वी, महिलाश्रम हायस्कूल, पुणे