बहुजननामा ऑनलाइन टीम – विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor-bhagatsingh-
महाविकास आघाडीने दिलेल्या 12 नावांपैकी 8 नावांवर राजकीय क्षेत्रातील असल्याने आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ज्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यात एकनाथ खडसे, राजू शेट्टीसह आठ जणांची नावे आहेत. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून त्यांचे सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात योगदान नाही, असा दावा याचिकेत केला आहे. त्यावर येत्या 24 तारखेला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्यपालांकडून काही निर्णय घेतला गेला नाही, तर राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत यावर पुन्हा चर्चा करून नवीन प्रस्ताव राज्यपालांना पाठवणार का किंवा राज्य सरकार कोर्टाचे दरवाजे ठोठावणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.