सोलापूर बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकीसाठी वंचित सोबत जाण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शुक्रवारी सोलापूर येथे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आल्यानंतर ते राष्ट्रवादी भवन येथे बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून आघाडीबाबत काहीही वक्तव्ये केलेली असतील. परंतु आम्ही ते दुखावतील असं उत्तर देणार नाही. परंतु समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल. तर लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचा परिणाम लोकसभा निवडणूकीत मत विभाजनामध्ये झाला आहे. नाही तर सोलापूरचा निकाल वेगळा असता.