मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा गुंता सुटत नसल्याच दिसताच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. याबाबत केंद्रात देखील एक बैठक झाली. कोणत्याही क्षणी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते त्यामुळे राज्यात आता कोणाचीही सत्ता नाही हे जवळ जवळ निश्चित झालेले आहे.
सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाच नाही
शिवसेनेकडून काल सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचालींना सुरुवात झाली होती. त्यावेळी सेना सत्ता स्थापन करणार असेच सगळ्यांना वाटत होते मात्र काँग्रेसने ऐन वेळी संमत्ती पत्र न दिल्याने सेनेला सत्ता स्थापनेपासून वंचित रहावे लागले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?
भारताच्या राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० ही आणीबाणीशी संबंधित आहेत. यामध्ये ३ प्रकारच्या आणीबाणी आहेत.
१)राष्ट्रीय आणीबाणी, २)आर्थिक आणीबाणी, ३) राष्ट्रपती राजवट.
कलम ३५६ नुसार राज्यातील प्रशासन सुव्यवस्थेत नसल्यास राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे. ज्या राज्यातील सरकार केंद्राच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत आहेत तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतला जातो, राज्यपाल राष्ट्रपतींकडे राज्यातील परिस्थितीचा अहवाल देतात त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात येते.
Visit : bahujannama.com