नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील तरुणांनी आतंकवादाला सडेतोड उत्तर दिलं आहे. पहिल्या दिवशी रियासीतील सैन्य भरती शिबिरात 29 हजार अर्ज आले. यापूर्वी 500 हून अधिक काश्मीरी जवानांच्या पासिंग आउट परेडने पाकिस्तानच्या काश्मीर मुद्यावर प्रत्युत्तर दिले.
जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये हजारो तरुणांची गर्दी झाली आहे. या हजारो तरुणांना सैनिक व्हायचे आहे. यांना हातात बंदूक घ्यायची आहे. हे तरुण पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ इच्छित आहे. या तरुणांना ना ही आतंकवाद्यांची भीती आहे आणि ना ही त्यांना जैश-लष्कर सारख्यांची पर्वा आहे.
नवीन काश्मीरमधील या तरुणांना तर फक्त आणि फक्त सैनिक व्हायचं आहे. सैनिक बनण्याच्या वेडाने ते भारावलेले आहेत. रियासीतील भरतीसाठी आलेल्या या तरुणांनी आपल्या सैनिक होण्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. भारताप्रति आपले प्रेम आणि पाकला आपण सैनिक होऊन कसे उत्तर देऊ हे त्यांनी सांगितले आहे. काहींनी गाणं म्हणत भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाचीही स्तुती केली आहे.