बहुजननामा ऑनलाइन टीम – राजौरीमध्ये 16 मराठाच्या पोस्टवर शनिवारी (दि. 21) सकाळी झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा (ता. करवीर) येथील हवालदार संग्राम पाटील शहीद झाले. काल मध्यरात्रीपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग झाल्याने त्यांनी केलेल्या गोळीबारात पाटील यांना वीरमरण (Sangram Patil martyred in PAK’s cowardly attack)आले. ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
मराठा बटालियनमध्ये गेल्या 17 वर्षांपासून पाटील सेवा बजावत होते. अत्यंत प्रामाणिक आणि देशसेवेसाठी कर्तव्य दक्ष असलेल्या पाटील यांच्या आधारावर गावाकडे त्यांच्या आई-वडील व भावांनी शेती आणि संसार उभारला होता. पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच आज सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गावात लष्कर, शासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. पाटील यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहीण आहेत. दोन वर्षांच्या पदोन्नतीसाठी त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती