बहुजननामा ऑनलाईन – केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशसह देशभरातील अनेक राज्यांत पुराचा कहर झाला आहे. पुरामुळे १७० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हवामान खात्याने केरळमध्ये जोरदार वारा असलेल्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. एनडीआरएफचे पथक आणि सैन्य बचाव कार्यात व्यस्त आहेत.
दरम्यान मागील ८ दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महापुराने थैमान घातले आहे. यात लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही परिस्थिती थोडी आटोक्यात येत नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशसह देशभरातील अनेक राज्यांत पुराचा कहर झाला आहे. काही ठिकाणी अजून दुष्काळच संपला नाही. तर काही ठिकाणी महापुराने असा कहर केला आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातील या महापूराची आणि तेथील नागरिकांची पाहणी करण्यासाठी येथे आज गृहमंत्री अमित शहा हे बेळगावला भेट देणार आहेत. त्याचवेळी राहुल गांधी आपल्या मतदार संघातील वायनाडमध्ये भेट देणार असल्याचे समजते. तसेच केरळमधील पुरामुळे तर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. राज्यातील मल्लापूरममधील कोट्टाकुन्नूमध्ये भूस्खलन पहायला मिळाले. मात्र, सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानीची झाली नाही.