नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात राजकीय दृष्टीने सध्या निर्णायक स्थिती आहे. मोदी-शाह जोडगोळीने संविधान आणि लोकशाही संपवण्याचा घाट घातला आहे. ‘संविधान आणि लोकशाही’साठी देशातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणार्पण केले आहे. ते वाचवण्यासाठी उभे राहणे हे आज प्रत्येक देशप्रेमी भारतीयाचे कर्तव्य आहे. यासाठी केजरीवाल, ममता, नायडू एकत्र आले आहेत,’ असे आप नेते गोपाळ राय यांनी म्हटले आहे.
१३ फेब्रुवारीला दिल्लीतील जंतर मंतर येथे रॅली आयोजित करणार आहेत. ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ रॅलीला तीनही राज्यांचे मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांना नरेंद्र मोदी व अमित शाह भेटी देत आहेत. तसेच तेथील जनतेला भाजपकडे आकृष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
इतर भाजप नेतेही तेच करत आहेत. यामुळे देशाच्या संघराज्याच्या संरचनेचा उपहास केला जात आहे. मोदी सरकारने केंद्रीय संस्थांचा धूर्तपणे गैरवापर करून राजकीय विरोधकांची गळचेपी केली आहे. नियम आणि कायद्यांचा अनादर करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने पार केल्या आहेत,’ असेही राय म्हणाले.