मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सोनी टोव्हीवरील अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती ११ ‘ या दिवसात जबरदस्त चर्चेत आहे. शोची टीआरपी सर्वात वर सुरू आहे. या शोमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यात सहभाग घेणारे लोक या शोच्या प्रसिद्धिमागील खरे कारण आहेत. गुरुवारी केबीसी ११ मध्ये पंजाबचा स्पर्धक अभिषेक झा अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसला होता. अभिषेक झा यांनी केबीसी -११ मध्ये एक उत्तम खेळ खेळला. ५० लाखांच्या प्रश्नावर त्याने शो सोडत २५ लाख जिंकले. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान त्याने सांगितले की, २५ लाख जिंकल्यानंतरही त्याला घरच्यांच्या शिव्या ऐकाव्या लागल्या.
अभिषेक झा यांनी केबीसी ११ मधील ५० लाखांकरिता विचारलेला प्रश्न हा होता- २०१६ मध्ये विमानाने प्रवास पूर्ण करणाऱ्या पहिल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या विमानाचे नाव काय आहे ? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे – ‘सोलर इम्पुल्स टू’. या प्रश्नावर अभिषेक अडकला होता. मिळविलेल्या माहितीनुसार त्याला घरी बोलणी खावी लागली. या अहवालात असे सांगितले गेले आहे की अभिषेकने स्वत: आपल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
अभिषेक झा यांनी मुलाखतीत सांगितले की, कार्यक्रमातून २५ लाख जिंकून जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा घरातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की एका प्रश्नावर अडकले असूनही लाईफ लाइन न घेतल्याबद्दल घरच्यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. अभिषेक मंगळवार १ ऑक्टोबरला हॉट सीटवर आला होता. पण २ ऑक्टोबरला काही कारणास्तव त्याचा खेळ गुरुवारी म्हणजेच 3 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलला गेला. बुधवारी म्हणजेच ९ ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये झारखंडची मुलगी एक अतिशय रोमांचक खेळ खेळत २५ लाख रुपयांवर पोचली. झारखंडमधील मेहंदीनगरमधील रहिवासी असलेल्या दीपज्योतीने ८ ऑक्टोबर रोजी तिच्या चारही लाइफलाईन वापरल्या आहेत. तिने चार लाइफलाइनचा वापर करुन १२.५० लाख रुपये जिंकले.
Visit : bahujannama.com