बहुजननामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरचे विभाजन झाल्यापासून तेथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी शनिवारी अनंतनागला येथे भेट दिली. या भेटीमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिक आणि पशू व्यापाऱ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला.
दरम्यान डोवल हे जम्मू-काश्मीरचे विभाजन झाल्यापासून ते तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ६ तारखेसपासून ते श्रीनगर परिसरात होते. तिथे असतानाही त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. आता ते दहशतवाद्यांचे केंद्र असणाऱ्या अनंतनागमध्ये दाखल झाले आहेत. तसेच तिथे पोहचल्यानंतर त्यांनी तेथील पशु प्राण्याबरोबर चर्चा केली आहे.
अनंतनागच्या पशुच्या बाजारामध्ये प्रामुख्याने बोकडांची विक्री होत आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करताना, बोकडांचा दर, वजन आणि खुराक यांची ते विचारपूस करत आहेत. डोवल हे इथे नागरिकांशी चर्चा करत असताना ते एका तरुणाशी चर्चा करत असताना त्याने बोकड कारगिल जिल्ह्यातील द्रासमधून आणल्याचे सांगतानाच, ‘द्रास कोठे आहे, तुम्हाला माहीत आहे का ? असा प्रश्नही विचारला. हे ऐकून अनंतनागचे उपायुक्त खालिद जनागिर यांनीच त्याला सांगितले, की ‘तुझ्याशी जे बोलत आहेत ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. नंतर डोवाल यांनी त्या तरुणाच्या पाठीवर थाप मारली.