नवीदिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतीलच काश्मिरी विद्यार्थी भीतीच्या छायेत वावरत नसून देशभरातील काश्मिरी विध्यार्थी भीतीच्या छायेत असून त्यांची सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
जामिया मिलिया इस्लामिया संस्थेतील काश्मिरी विद्यार्थ्यांने सांगतिले,की विचार काहीही असले तरी केवळ काश्मिरी असल्याने आमच्या जिवाला धोका आहे. देशभरात हेच घडत आहे. डेहराडून, बंगळुरू, अंबाला येथे काश्मिरी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचे प्रकार सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कार्यकर्त्यां सेहला रशीद या काश्मीरच्या असून त्यांनी सांगितले,की देशभरात काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात येत आहेत,
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे पुढे करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठातील काश्मिरी विद्यार्थी अनिस अहमद याने सांगितले. की आम्ही समाजमाध्यमांवरील टिप्पण्यांना उत्तरे दिलेली नाहीत तरी आम्हाला दहशतवादी ठरवले जात आहे. भाडयाने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना घरे सोडण्यास घरमालकाकडून भाग पाडण्यात आले आहे.
काश्मिरींसह सर्वानाच सुरक्षा दिली आहे.बंगळुरू येथे शिकणाऱ्या एका काश्मिरी विद्यार्थ्यांला शनिवारी जैशच्या दहशतवाद्याचे अभिनंदन केल्यावरून अटक करण्यात आली, पोलिस उपायुक्त मधुर वर्मा यांनी सांगितले, की दिल्लीत अल्पसंख्याक समाजाचे लोक राहत असलेल्या भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.