बहुजननामा ऑनलाईन – काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तान सतत राजनैतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. काश्मीरबाबतच्या निर्णयानंतर लगेचच पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते जनरल असिफ गफूर यांनी आपले लष्करप्रमुख कमर बाजवा यांची बाजू घेत की पाकिस्तानने कलम ३७० कधीच मान्य केला नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या विरोधात एकामागून एक पावले उचलली. पाकिस्तानने भारताशी संबंधित राजनैतिक संबंधांना कमी करण्याचा निर्णय घेतला आणि आपले राजदूत आणि उच्च आयुक्तांना परत बोलावले, द्विपक्षीय व्यापार आणि भारतीय चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी घातली आणि त्यानंतर पाकिस्तानने लाहोर ते नवी दिल्लीपर्यंत चालणाऱ्या समझौता एक्सप्रेसलाही बंद केले.
सौदी अरेबिया आणि युएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी (ता.५) पाकिस्तानला भेट दिली. या भेटीत युएईने पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले , की काश्मीर हा मुद्दा द्विपक्षीय आहे आणि त्यात मुस्लिम जगाला ओढण्याचा प्रयत्न करु नये. काश्मीरबाबत भारतविरोधी कोणतेही विधान सौदी अरेबिया आणि युएईच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून आले नाही. भारताविरुद्ध उभे राहण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ते त्यात अपयशी ठरले. कोणत्याही देशाने भारताने कश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयावर टिका केली नाही.
पाकिस्तानने सर्वात आधी चीनकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला.पाकिस्तानने चीनच्या आडून स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीरच्या काही भागावरही चीनचा कब्जा असल्याने काश्मीरच्या मुद्दय़ावर त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये बंद दाराआड चर्चा करणे पसंत केले. १९६५ नंतर प्रथमच काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्यात आला. तथापि, पाकिस्तान आणि चीन यांना यातून फारसे काही मिळाले नाही कारण बाकीचे देश त्यांचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध आणि मैत्री लक्षात घेता भारताच्या बाजूने उभे राहिले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी भारताचा जुना मित्र रशियाने भारताला पाठिंबा दर्शविला. तर फ्रान्सने यूएनएससीमध्ये उघडपणे भारताला पाठिंबा दर्शविला. तर काश्मीरवर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समधील जी -७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली तेव्हाही त्यांनी कश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि मोदी कश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवतील असे सांगून पाठिंबा दर्शविला होता.
अरब देशांशी मोदींनी जवळीक साधल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. कोणत्याही अरब देशाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ आवाज उठविला नाही. मुस्लिम समुदायाचे सर्वात मोठे जागतिक व्यासपीठ असलेल्या इस्लामिक को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनने (ओआयसी) देखील कोणताही प्रतिसाद दिला नाही. युएईच्या भारतातील राजदूतांनी कलम ३७० च्या निर्णयावर अलीकडील बदलांमुळे काश्मीरमधील सामाजिक न्याय व सुरक्षा सुधारेल आणि या प्रदेशात स्थिरता-शांतता वाढेल. अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान, अफगाणिस्ताननेही काश्मीर मुद्द्यावर ओढल्यामुळे तालिबाननेही पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे.
काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या दरम्यान सौदी अरेबियाने भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर तब्बल १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. सौदीच्या दृष्टिकोनातून भारताला कोणत्याही मदतीची गरज नाही, असे विधान ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार शाळेचे डीन श्रीराम चौलिया यांनी केले आहे. मात्र पाकिस्तानची परिस्थिती अगदी या उलट आहे. पाकिस्तानची कर्जबाजारी अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा नऊ पटीने कमी आहे.
पाकिस्तानचा आरडाओरडा करुनही जगातील सर्व देश याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. ऑक्टोबरमध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या जागतिक दहशतवादी संघटनांना वित्तपुरवठा करणाऱ्या पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि पाकिस्तानलाही स्वतःला सर्वच मार्गाने काळ्या सूचीत येण्यापासून रोखायचे आहे. काश्मीरप्रश्नी पाकिस्तानकडे फारच कमी पर्याय उरले असून तो आपल्या घरात आपला चेहरा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तान चांगल्या आणि वाईट तालिबान्यांच्या धर्तीवर भारतविरोधी दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन देत राहतो का हे पाहणे बाकी आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी