नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या लवेपोरा भागात अतिरेकी आणि सीआरपीएफ जवानांमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) जवान शहीद झाला. पण शहीद होण्यापूर्वी जवानानं देशासाठी अशी कृती केली की तो अमर झाला. बुधवारी, सुरक्षा दलाला लावेपोरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम राबविली आणि त्या भागाला वेढा घातला. दरम्यान, अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी तरुण रमेश रंजन यांच्या डोक्यावर गोळी झाडली.
गोळी लागल्यानंतरही रमेशने रायफल घेतली आणि प्रतिउत्तर देण्यासाठी फायरिंग सुरु केले. जमिनीवर पडता-पडता त्याने एका आतंकवादीला ठार मारले. गोळीबाराचा आवाज ऐकून उर्वरित सैनिक सतर्क झाले आणि त्यांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रमेश रंजन यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथेच त्यांना शहीद घोषित करण्यात आले. रमेश रंजन हे बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील आहे. मृत्यू नंतर शिपाई रमेश रंजन चकमकीत मरण पावले अशी माहिती त्यांच्या घरी देण्यात आली. शहीद जवान रमेश रंजन यांना २०११ साली केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ७३ बटालियनमध्ये कॉन्स्टेबल पदावर पुन्हा नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांची पहिली पोस्टिंग संबलपूर ओरिसा येथे होती, नंतर त्यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली. त्यांच दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.
रमेश रंजन यांचे वडील राधा मोहन सिंह म्हणाले की, सुमारे महिनाभरापूर्वी त्यांचा मुलगा सुट्टीवर घरी आला होता, सुट्टी संपल्यानंतर आपल्या ड्युटीवर जम्मू-काश्मीरला गेले होते. मुलाशी नेहमीच चर्चा व्हायची, काल संध्याकाळी देखील त्यांचे मुलाशी बोलणे झाले होते. मग त्याच्या बटालियनच्या कमांडंटला फोन आला की दहशतवाद्यांशी चकमक झाली, त्यात रमेश रंजन शहीद झाले आहे. मुलाच्या शहिद्यावर रमेशचे वडील म्हणतात की दहशतवाद्यांना ठार मारून शाहिद झालेल्या मुलाचा मी बाप आहे याचा मला अभिमान आहे. रमेशच्या आईचे अश्रू थांबत नाहीये. रमेशचे नातेवाईक म्हणतात की ते आमच्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहेत.
दहशतवाद्यांची झाली ओळख :
दहशतवाद्यांविरूद्ध हे ऑपरेशन सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे चालवले होते. खाटीब अहमद दास आणि जियाउल रहमान वानी असे ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोन जणांची नावे आहेत.