बंगरुळु : वृत्तसंस्था – भाजप सरकारने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात आपली सत्ता स्थापन केली. परंतु त्यानंतर आता कर्नाटकाचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण सत्ता स्थापन केलेले भाजपचे काही नाराज आमदार काँग्रेसस पक्षाच्या संपर्कात असल्याचे काँग्रेस नेते सतीश जारकी होळी यांनी सांगितले. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच पेटले आहे.
‘भाजपच्या काही नाराज आमदार काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात आहेत, त्यामुळे पुढे काय घडणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. योग्य निर्णय घेणें गरजेचे आहे, कारण आम्ही सर्वानाच पक्षात घेऊ शकत नाही तसेच कोणाला सोडू देखील शकत नाही. त्यामुळे योग्य तो निर्णय विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातूनच घेतला जाईल.’ असे सतीश जारकी होळी यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले कि, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीआम्ही उमेदवार उभे करू असे जरी भाजपला वाटत असले तरी काँग्रेस निवडणुकांपूर्वीच यासंदर्भात विचार करेल. हायकमांडशी चर्चा झाल्याने आता काँग्रेस कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागेल आहेत.’
दरम्यान कर्नाटकात येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यानंतर वातावरण जरा स्थिर आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला होता, परंतु काँग्रेस पक्षाने जेडीएसला पाठिंबा दिल्याने त्यावेळी काँग्रेस सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरले , परंतु कुमारस्वामी सरकारच्या अंतर्गत भांडणांमुळेच हे सरकार अवघ्या १४ महिन्यांतच पडले, त्यानंतर जवळपास १५ आमदारांनी भाजपची वाट धरली होती, त्यामुळे राजकीय वातावरण पेटले होते, त्यानंतर येडियुरप्पा सरकार सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरले. परंतु काँग्रेसच्या जारकीहोळी यांच्या या व्यक्तव्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला ६ जागांवर विजय मिळविले गरजेचे आहे, सध्या राज्यात भाजपकडे १०६ आमदारांचा पाठिंबा आहे.
Visit : bahujannama.com