बहुजननामा ऑनलाईन टीम : कर्नाटकातील निकालाचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यकत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेस आता लोकांचा विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपुर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठीत खंजीर खुपण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देईल. जनतेने भाजपाला नवी ताकद दिली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानत शिवसेनेवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
झारखंडमधील बरही या ठिकाणी प्रतारसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भाजपा दक्षिण भारतात कमकुवत आहे, असे बोलले जात होते. पण कर्नाटकात आलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने त्याला उत्तर मिळाले. जनतेचा कौल नाकारुन मागच्या दरवाजाने सरकार स्थापन करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवला. लोकशाही पद्धतीने जनतेने त्यांचे कटकारस्थान उद्ध्वस्त केले. पोटनिवडणुकीत भाजपा सरकार राहणार काही जाणार, असा प्रश्न केला जात होता. त्याला जनतेने उत्तर दिले आहे.’
PM Modi in Hazaribagh, Jharkhand: Aaj Karnataka ke logon ne sunishet kardiya hai ki ab Congress & JDS wahan ke logon ke saath vishwasghat nahi kar paayegi. Ab Karnataka mein jod-tod wali nahi, wahan ki janta ne ek sthir aur mazboot sarkar ko taqat de di hai. pic.twitter.com/rdnk5EW0wv
— ANI (@ANI) December 9, 2019
कर्नाटकमध्ये कॉंग्रेसने भाजपाला सरकार बनवू दिले नाही. त्यांना जनतेने त्याची शिक्षा दिली. कर्नाटकात स्थिर आणि विकासासाठी भाजपाला विजयी केल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. ७० वर्षापासून या १५ जागेंवर भाजपाचा विजय झाला नव्हता. मात्र, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जनतेने त्याठिकाणी भाजपाचं कमळ फुलवलं. कॉंग्रेस कधीच आघाडी धर्माचे पालन करणार नाही. भ्रष्टाचारासाठी कॉंग्रेस कोणत्याही मर्यादा ओलांडू शकते, अशी टीका त्यांनी केली.
#WATCH PM Modi #KarnatakaByelection: What the country thinks about political stability and for political stability how much the country trusts BJP, an example of that is in front of us today… BJP is leading on most seats. I express my gratitude towards people of Karnataka. pic.twitter.com/k1Ho75Xmse
— ANI (@ANI) December 9, 2019
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपाने पहिला विजय नोंदविला असून 15 पैकी 11 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने येल्लापूरची जागा 31 हजार मतांनी जिंकली आहे. या 12 जागांवर काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांनाच भाजपाने मैदानात उतरविले होते. याचा फायदा भाजपाला झाला आहे.
कर्नाटकमध्ये विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाशी शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. मात्र, संख्याबळ नसल्याने फडणवीसांनी राजीनामा दिला होता. भाजप महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्येही सर्वात मोठा पक्ष ठरला. यानंतर येडीयुरप्पांनी जेडीएस आणि कॉंग्रेसच्या १७ आमदारांना फोडले आणि त्यांना राजिनामा द्यायला सांगितला. त्यामुळे कुमारस्वामी अल्पमतात निवडुन आले आणि कॉंग्रेसची आघाडी तुटली.
Visit : bahujannama.com