सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – भाषेला सीमा नसून संमिश्र भाषा प्रदेशातील असे वातावरण सौहार्दतेसाठी उत्तम ठरू शकते. त्याकरिता आगामी काळात कलबुरगी येथे कन्नड साहित्य परिषदेकडून कलबुरगीच्या कन्नड भवनमध्ये बहुभाषिक साहित्य मेळावा घेऊ,असे आश्वासन कन्नड साहित्य परिषदेचे कलबुरगी जिल्हाध्यक्ष वीरभद्र शिंपी यांनी केले.
मराठी भाषा दिनानिमित्त अ.भा.मराठी साहित्य महामंडळ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने करामसापच्या कलबुरगी येथील कार्यालयात बहुभाषिक लेखक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करामसापचे अध्यक्ष व महामंडळाचे सदस्य प्राचार्य भालचंद्र शिंदे होते. या मेळाव्यामध्ये मराठी बरोबरच हिंदी, कन्नड, ऊर्दू साहित्यिक व कवींनी सहभाग नोंदवला. प्रभाकर सलगरे यांनी स्वागत केले. कार्यवाह प्रा.विजयकुमार चौधरी यांनी प्रास्तविक केले. कवी समिक्षक प्रा.व्यंकटेश वळसंगकर यांनी बृहन्महाराष्ट्रात मराठी साहित्य व संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगत मराठीतील साहित्यिक व कवींचा तसेच भक्तीसंप्रदायाचा आढावा घेतला. कन्नड साहित्यिक डॉ.अमृता कटके यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर बहुभाषिक कवीसंमेलन पार पडले, यामध्ये सुमन शेगेदार, प्रा.शकुंतला सोनार, बी.ए.कांबळे, प्रा.व्यंकटेश वळसंगकर, डॉ.वाहीद अंजुम, सुनील चौधरी, मल्लण्णा वालीकार, प्रा.विजयकुमार चौधरी, प्रा.सुरेश हेरूर, गुरय्या स्वामी या काव्यवाचनात सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य भालचंद्र शिंदे यांनी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीचा उहापोह केला. यावेळी नरसिंगराव मराठे, मिलींद उमाळकर, संध्या शिंदे, ॲड.नागेश मोरे, कसापचे दौलतराव पाटील, वर्षा वळसंगकर, विनय शिंदे आदी उपस्थित होते. राधिका भोगले यांनी सूत्रसंचलन केले. गुरय्या स्वामी यांनी आभार मानले.
सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – भाषेला सीमा नसून संमिश्र भाषा प्रदेशातील असे वातावरण सौहार्दतेसाठी उत्तम ठरू शकते. त्याकरिता आगामी काळात कलबुरगी येथे कन्नड साहित्य परिषदेकडून कलबुरगीच्या कन्नड भवनमध्ये बहुभाषिक साहित्य मेळावा घेऊ,असे आश्वासन कन्नड साहित्य परिषदेचे कलबुरगी जिल्हाध्यक्ष वीरभद्र शिंपी यांनी केले.
मराठी भाषा दिनानिमित्त अ.भा.मराठी साहित्य महामंडळ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने करामसापच्या कलबुरगी येथील कार्यालयात बहुभाषिक लेखक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करामसापचे अध्यक्ष व महामंडळाचे सदस्य प्राचार्य भालचंद्र शिंदे होते. या मेळाव्यामध्ये मराठी बरोबरच हिंदी, कन्नड, ऊर्दू साहित्यिक व कवींनी सहभाग नोंदवला. प्रभाकर सलगरे यांनी स्वागत केले. कार्यवाह प्रा.विजयकुमार चौधरी यांनी प्रास्तविक केले. कवी समिक्षक प्रा.व्यंकटेश वळसंगकर यांनी बृहन्महाराष्ट्रात मराठी साहित्य व संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न असल्याचे सांगत मराठीतील साहित्यिक व कवींचा तसेच भक्तीसंप्रदायाचा आढावा घेतला. कन्नड साहित्यिक डॉ.अमृता कटके यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर बहुभाषिक कवीसंमेलन पार पडले, यामध्ये सुमन शेगेदार, प्रा.शकुंतला सोनार, बी.ए.कांबळे, प्रा.व्यंकटेश वळसंगकर, डॉ.वाहीद अंजुम, सुनील चौधरी, मल्लण्णा वालीकार, प्रा.विजयकुमार चौधरी, प्रा.सुरेश हेरूर, गुरय्या स्वामी या काव्यवाचनात सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य भालचंद्र शिंदे यांनी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वाटचालीचा उहापोह केला. यावेळी नरसिंगराव मराठे, मिलींद उमाळकर, संध्या शिंदे, ॲड.नागेश मोरे, कसापचे दौलतराव पाटील, वर्षा वळसंगकर, विनय शिंदे आदी उपस्थित होते. राधिका भोगले यांनी सूत्रसंचलन केले. गुरय्या स्वामी यांनी आभार मानले.