पटणा : वृत्तसंस्था – जेएनयूचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैय्या कुमार हा आपल्या भाषणांसाठी चर्चेत असतो. पण सध्या तो एका तो आपल्या चुकीमुळे चर्चेत आहे. पटणामध्ये ‘संविधान वाचवा, नागरिकत्व वाचवा’ या महारॅलीत कन्हैय्याने असे काही केले ज्यामुळे सर्वांना हसू आले. कन्हैय्या जेव्हा रॅलीत राष्ट्रगीत म्हणत होता तेव्हा त्याने शेवटच्या दोन ओळींमध्ये ‘जन गण मंगल’च्या ऐवजी ‘जन मन गण’ म्हटले. नंतर मात्र त्याला आपल्या चुक कळल्याने त्यानंतर त्याने पुन्हा एकदा राष्ट्रगीत पूर्ण गायले.
https://twitter.com/DareDevilAnupam/status/1233247938475892741
या चुकीनंतर दुसऱ्यांना निशाणा साधणारे कन्हैय्या कुमारला लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरु केले. पटणाच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर गुरुवारी एनपीआर, एनआरसी आणि सीएए विरूद्ध संघर्ष मोर्चा ‘संविधान वाचवा, नागरिकत्व वाचवा’ अशी महारॅलीचे आयोजन केले गेले होते. यात कन्हैय्या कुमारसह इतर अनेक डाव्या विचारसरणीच्या लोकांचा सहभाग होता. या महारॅलीत वक्त्यांनी दिल्लीच्या हिंसेसाठी केंद्र सरकारला निशाना साधला.