बहुजननामा ऑनलाइन टीम – कंगना अखेर चार दिवसांच्या आपल्या मुंबई दौऱ्यानंतर पुन्हा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. पण तिकडे गेल्यानंतर आती आणखी भडक विधानं करु लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता कंगनाने थेट आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे तिने केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलं आहे. कंगनाने आज (सोमवार) पाचच्या सुमारास हे ट्विट केलं आहे.
कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरे सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ समस्या अशी आहे की, मी मुव्ही माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ही सगळी मंडळी ठाकरे यांचे लाडके चिरंजीव आदित्य यांच्यासोबत असतात. हा माझा मोठा अपराध आहे. म्हणूनच माझा बंदोबस्त करण्यामागे ते आहेत. पण ठिके. आता बघू कोण कुणाचा बंदोबस्त करतो, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1305465116255612931
कंगनाच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा राज्यात भुकंप येण्याची शक्यता आहे. आजपर्यत कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान देत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. सुशातच्या हत्येत सहभागी असणारे, अंमली पदार्थाची तस्करीत दिसणारे आदित्य यांचे साथीदार असल्याचे दोन गंभीर आरोप कंगनाने केले आहेत. आता कंगनाच्या या आरोपांवर आदित्य किंवा उद्धव ठाकरे कशी प्रतिक्रिया देतात हे पहावे लागले.
दरम्यान, शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावलं आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं रहावं. कंगनानं आपला बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल तर आम्ही ऐकून घेणार नाही, अशा शब्दात अनिल परब यांनी इशारा दिला आहे.