कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील भाजपचे महासचिव आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान जनसमुदायाला उद्देशून त्यांनी विधान केले आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी “आमचे सरकार आले की आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू. ज्यांना कोंबडा बनवायचे आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची आम्ही करून ठेवली आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत., याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोंडात येत नाहीत,” असे म्हणत सरळसरळ अधिकाऱ्यांना धमक्याच दिल्या आहेत.
BJP Leader Kailash Vijayvargiya openly threatening "to burn the city Indore".
Ye hi hai inka asli roop. pic.twitter.com/WbcEBT0fux
— Mehul Choradiya (@ChoradiyaMehul) January 3, 2020
या घटनेचा विडिओ समोर आला असून त्यात ज्यावेळी भाजपचे सरकार बनेल त्यावेळी भाजपचा मुख्यमंत्री होईल. जे चमचेगिरी, भ्रष्टाचार करत आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास देत असतील त्यांची यादी तयार केली असल्याचे विजयवर्गीय यांनी सांगितले. तसेच यादी तयार झाल्यावर शोलेमधील तोच डायलॉग असेल की अब तेरा क्या होगा कालिया?, असेही विजयवर्गीय म्हणाले.
याअगोदरही कैलास विजयवर्गीय आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी एका अधिकाऱ्याला मध्य प्रदेशातील इंदूरला आग पावून देण्याची धमकी दिली होती. त्याही वक्तव्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इंदूरचे विभागीय आयुक्त आकाश त्रिपाठी यांनी भेट घेण्यास नकार दिल्याने विजयवर्गीय यांचा तोल जाऊन त्यांनी थेट धमकीच दिली.
#WATCH Kailash Vijayvargiya,BJP Gen Secy in-charge of West Bengal: Aapne (Govt officials) agar karyakartaon ko pareshan kiya toh BJP ke karyakartaon aur netaon ne koi choodi nahi pehen rakhi hai.Hum sharafat se kaam karte hain iska matlab ye nahi ki humein maryada thorhna ni aata pic.twitter.com/9op4cQKP0y
— ANI (@ANI) January 10, 2020
इतकेच नाही तर विजयवर्गीय हे भाजपचे मोठे नेते असून त्यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय हे आमदार आहेत. आकाश यांनी जुन्या जीर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्यामुळे ते चर्चेत होते. त्यावर त्यांना अटकही झाली होती. तसेच जमीन मिळण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तुरुंगाची हवापाणी खाल्ली होती.