औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत बौद्धमय व्हायला हवाय हा बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जपत. ‘बौद्धमय भारत निर्माण अभियानाचे मुख्य प्रवर्तक दिवंगत जी. एस .दादा कांबळे यांचा वैचारिक वारसा जपत ‘चलो बुद्ध की और ‘ चा नारा बुलंद करण्यासाठी सुप्रसिद्ध आंबेडकरी गायिका कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव बुद्ध धम्माची दीक्षा तथागत बुद्ध विहार ,म्हाडा कॉलनी ,औरंगाबाद येथे घेणार आहेत.
येत्या ३० जून (रविवार ) रोजी सकाळी ११ वाजता धम्माची दीक्षा असून सत्यशोधक समाज महासंघ व समता सैनिक दलाच्या वतीने या दीक्षा समारोहाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. डी. व्ही. खिलारे हे राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अरविंद गायकवाड ,के. ई . हरदास ,अॅड.एकनाथ रामटेके .आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.