नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपसोबतच्या वाढत्या वादामुळे एनडीएतून बाहेर पडलेली शिवसेना संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधी बाकड्यावर पाहायला मिळणार आहे. निकालापासूनच शिवसेनेचे संजय राऊत भाजपवर हल्लाबोल करताना दिसले आहे, त्यात आता पुन्हा महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेच्या खासदारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतही राऊतांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे राऊत यांनी हल्ला चढविला आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाल्याने खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत हजेरी लावली आहे. दिल्लीतही संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. ‘कभी कभी लगता है, अपुनही भगवान है… असा त्यांचा समज झाला आहे. मात्र, देशात मोठ-मोठे बादशहा येऊन गेले तरी लोकशाही कायम आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी हा समज चुकीचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणाच्या मालकीची संपत्ती नाही. त्यामुळे आम्हाल न विचारत घेता, शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढलेच कसे ? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.
Sanjay Raut, Shiv Sena, in Rajya Sabha: Sangharsh ka doosra naam Arun Jaitley tha, aur unke har sangharsh mein main unke saath raha. We used to follow all his orders. We learnt from Arun Jaitley what are relations and how to maintain them. #WinterSession pic.twitter.com/CzXpHNuFpm
— ANI (@ANI) November 18, 2019
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून शेरो-शायरीद्वारे भाजपावर टीकास्त्र सोडले.
तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था :-
मात्र, राऊतांच्या ट्विटमुळे अनेकांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, भाजपसोबत्त काडीमोड झाला असला तरी अद्यापही सेना यूपीएमध्ये सामील झालेली नाही. मात्र शिवसेना युपीएमध्ये सामिल होणार नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊत यांनी दिवंगत नेते अरुण जेटलींना श्रद्धांजली वाहिली, तसेच त्यांच्या निधनानं मोठी हानी झाल्याचंही ते म्हणाले.
Visit : bahujannama.com