ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री राहिलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. काही दिवसांपूर्वी मॉलमधील मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र आव्हाड सोमवारी विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या सिनेमाचा प्रयोग थांबवण्यासाठी गेले होते. सध्या वर्तकनगर पोलिस स्थानकाबाहेर (Vartak Nagar Police Station, Thane) मोठा पोलीस बंदोबस्त असून मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते पोलीस स्थानकाबाहेर जमले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ते जामीन घेणार नसल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “या (हर हर महादेव) चित्रपटामधून छत्रपती शिवाजी (Chatrapati Shivaji Maharaj) महाराजांबरोबरच मराठा (Maratha Caste) समाजाची बदनामी झाली. त्यावर आक्षेप घेतल्याने कारवाई होत असेल तर मी महाराजांचा मोठा रक्षक, अभ्यासक आहे. हे सरकार मला रोखू शकत नाही यापासून हे सरकार महाराजांना बदनाम करणाऱ्यांचं आहे की रोखणाऱ्यांच? अनैतिहासिक इतिहास दाखव्यासाठी अटक होणार असेल तर मी जेलमध्ये जाईल. जामीन (Bail) पण करणार नाही”.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) थेट उल्लेख न करता आव्हाड (Jitendra Awhad)
म्हणाले,“पोव्हिजनल एफआयरमधील कलमे जामीनपात्र आहेत.
मला अडकवण्यासाठी स्पेशल कलम शोधून आणलं आहे, कट केला आहे. सरकार कट करत आहे.
पोलीस हतबल आहेत. पोलीस हे पोलीस राहिलेच नाहीत.
मी प्रत्येक पोलीस स्थानकाबाहेर बाळासाहेबांची शिवसेना अशा पाट्या लावणार आहे.
मला कोणी आदेश दिलेत माहिती नाही. पण जनतेला दोन मिनिटांमध्ये कळालं आहे मी कोणाबद्दल बोलतोय”.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad arrested for stopping har har mahadev screening ncp legislator slams cm eknath shinde government says will not take bail
हे देखील वाचा :
Uday Samant | जितेंद्र आव्हाडांवर जी कारवाई झाली आहे, ती कायद्यानुसार झालेली आहे – उदय सामंत
Sushma Andhare | सुषमा अंधारेंना वाटते देवेंद्र फडणवीसांची काळजी; “म्हणाल्या त्यांनी थोडा ताण….”
Jitendra Awhad | “भावनिक ब्लॅकमेल करण्याची गरज नाही…”; मनसेचा आव्हाडांना सल्ला