बहुजननामा ऑनलाइन टीम – झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 81 जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या निकालावरुन झामुमो, कॉंग्रेस आणि आरजेडी युतीला बहुमत मिळेल असे दिसत आहे. त्याचवेळी भाजप आपली सत्ता गमावताना दिसत आहे. प्रादेशिक पक्ष आजसू आणि जेव्हीएम देखील चांगले कामगिरी करताना दिसत आहे. निवडणुकीत भाजप आणि आजसू यांनी स्वतंत्रपणे लढा दिला आहे. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्ष वेगळे झाले होते. निकाल पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की जर शेवटच्या क्षणी आजसू-भाजप वेगळे झाले नसते तर त्यांचा निकालही वेगळा लागला असता.
या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 33..46 टक्के मते मिळाली तर सुदेश महतो यांच्या आजसूला 8.30 टक्के मते मिळाली. अशा परिस्थितीत दोघांचा मतांचा वाटा 42 टक्के इतका आहे, तर आघाडीच्या पक्षांमध्ये झामुमोला 19 टक्के, कॉंग्रेसला 14 टक्के आणि राजदला 2.80 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच युतीला सुमारे 36 टक्के मते मिळाली आहेत. अशा परिस्थितीत जर दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असती तर जागांचे आकडे वेगळे असू शकले असते.
झारखंड निवडणुकीचे निकाल आतापर्यंत आले आहेत. झामुमोकडे 26, कॉंग्रेसला 12 आणि राजद 4 जागा मिळाल्या आहेत. युतीला 42 जागा मिळत आहेत. जे समान आघाडीपेक्षा जास्त आहे. त्याचवेळी भाजपला 28 जागा आणि एजेएसयूला 4 जागा मिळत आहे. काही जागांच्या फरकामुळे सरकार बदलू शकते..
53 जागांवर आजसू लढल्यामुळे पडला मोठा फरक
आजसून 81 जागांपैकी 53 जांगांवर आपले उमेदवार उतरवले होते. ज्यातील अर्ध्या जागेवर पक्षाला चांगले मतदान झाले आहे. तर अनेक जागी आजसूने काटे की टक्कर दिली आहे. 2014 मध्ये भाजपने आजसू सोबत युती केली होती आणि आजसून 8 जागेवर आपले उमेदवार उतरवत 5 जागा जिकंण्यात यश मिळवले होते. 30 नोव्हेंबर रोजी झारखंड विधानसभेला सुरुवात झाली होती. 7 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात 20 जागांवर, 12 डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यात 17 जागांवर तर 16 डिसेंबर रोजी 15 जागांवर चौथ्या टप्प्याचे मतदान आणि 20 डिसेंबर रोजी 16 जागांसाठी अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले होते.