बहुजननामा ऑनलाइन टीम : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी झारखंडमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर तीव्र हल्ला केला आहे. एनआरसीला विरोध केल्याबद्दल राहुल गांधींवर कटाक्ष घेत अमित शहा म्हणाले की, राहुल बाबा म्हणतात की, तुम्ही एनआरसी का आणत आहात आणि घुसखोरांना का बाहेर काढत आहात ? हे लोक कुठे जातील, ते काय परिधान करतील व काय खातील. घुसखोर राहुल बाबांचे चुलत भाऊ असल्याचे दिसते का, असे अमित शहा म्हणाले.
अमित शहाने विचारले की, घुसखोर राहुल बाबांचा चुलत भाऊ असल्याचे दिसते का ? जनतेला संबोधित करतांना अमित शहा म्हणाले की, राहुलबाबांना बोलू द्या, परंतु मी हे सांगण्यासाठी आलो आहे की, २०२४ च्या आधी भाजप या देशातून घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम करेल. झारखंडमध्ये बरीच सरकारे पाहिली पण विकासाला वेग मिळू शकला नाही, कारण कोणत्याही सरकारला पूर्ण बहुमत नाही. २०१४ मध्ये देशाने पंतप्रधान मोदींना पूर्ण बहुमत दिले आणि झारखंडने रघुवर दास यांना पूर्ण बहुमत दिले. परिणामी, आज झारखंड विकासाच्या मार्गावर गेला आहे.
ते म्हणाले की, झारखंडमधील भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही ठरविले आहे की, भाजपाचे सरकार स्थापन होताच आदिवासी व दलितांचे आरक्षण कमी न करता ओबीसी समाजाचे आरक्षण वाढवण्यासाठी आम्ही एक समिती गठीत करू. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वात झारखंड विकासाच्या मार्गावर आहे.अमित शहा म्हणाले की, बहरागोडा विधानसभेतील प्रत्येक गाव पंतप्रधान ग्राम सड़क योजनेंतर्गत रस्त्यांशी जोडले गेले आहे. सखी मंडळ बांधून हजारो बहिणींना रोजगार देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. बर्याच वर्षांपासून बरीच सरकारे स्थापन झाली, पण कोणीही झारखंडची निर्मिती केली नाही. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा झारखंडची स्थापना झाली आणि अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. जनतेला संबोधित करतांना अमित शहा म्हणाले की, जेव्हा तुम्ही ७ डिसेंबरला मत देण्यासाठी जाता तेव्हा ते मत कुणालाही आमदार बनविणे, सरकार बनविणे किंवा रघुवर दास यांना मुख्यमंत्री बनविण्याचे नसून विकासाचे असेल. भाजपाला दिलेला प्रत्येक मत झारखंडच्या विकासासाठी असेल.
Visit : bahujannama.com