पुणे : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतच आहेत. चंद्रकांत पाटील यांना हे माहितच असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते. त्यावरूनच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे, असा टोमणा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना मारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद दिले तर ‘मातोश्री’च्या बाहेर कॅमेरे लावले जातील, अशी धारदार टीका भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. ही टीका त्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल बोलताना केली.
गेली पंचवीस वर्षे भाजपने शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्यांची फसवणूक केली आहे. तसेच त्यांना लहान भाऊ म्हणून वागवले. याचमुळे शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचा अनुभव चांगला असेल, अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.