मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आज पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारची (Shinde-Fadnavis Govt) टीका केली आहे. जयंत पाटील यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Issue), गुजरात निवडणुकांचा निकाल (Gujarat Election Results) आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटांवर त्यांचे मत मांडले आहे. (Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt)
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात वाद सुरु आहे. तेथील मुख्यमंत्री, आपल्या राज्याबद्दल चुकीचे बोलतात, आपल्या राज्यातील वाहनांची तोडफोड होते. मात्र, आपल्या राज्यात कर्नाटकाच्या बँकेला व्यवसाय दिला जात आहे. जर आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेऊन काम करणार असतील, तर हे दुर्दैव आहे. आपल्या सरकारच्या विद्वत्तेचे करावे तितके कौतुक कमी आहे.’
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे जयंत पाटील म्हणाले, ‘सीमाभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशस्वी ठरले आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत,
यासर्वांबाबत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळे महाविकास आघाडी १७ डिसेंबरला मोर्चा काढणार आहे.
तसेच, कांग्रेस आणि आपमध्ये मतांची विभाजन झाल्यामुळे भाजपला गुजरातमध्ये फायदा झाला, असेही ते म्हणाले.
Web Title :- Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ncp leader jayant patil slams shinde fadnavis goverment maharashtra over Maharashtra Karnataka Border Issue
हे देखील वाचा :
Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक