जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – Jayant Patil On President Rule In Maharashtra | सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) योग्य निकाल आल्यास राज्य सरकार (Maharashtra State Government) कोसळू शकते, मात्र मध्यावधी निवडणुकाऐवजी (Mid-Term Election) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President’s Rule) लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आमदार दीलीप वाघ (MLA Dilip Wagh) यांच्या घरी जयंत पाटील (Jayant Patil On President Rule In Maharashtra) पत्रकारांशी संवाद साधत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जयंत पाटील (Jayant Patil) पुढे म्हणाले, सध्याचे हे सरकार निवडणुका घेयला घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निडणूका कशा पुढे ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरु आहे. बाजार समितीच्या निवडणुका (Market Committee Elections) पक्ष म्हणून लढवल्या जात नाहीत, तर कर्यकर्ता ती निवडणूक लढवत असतो. इतर निवडणुकीमध्ये मात्र सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढाव्यात ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे पाटील म्हणाले. (Jayant Patil On President Rule In Maharashtra)
परिस्थितीनुसार स्थानिक जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना त्या संदर्भातील अधिकार देण्यात आले आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपकडून धार्मिक भावना भडकवल्या जात आहेत. तर देशात कुठल्या घोषणा दिल्या जातील किंवा कोणी काय बोलावं, याचा देखील निर्णय कोर्टच घ्यायला लागलं असल्यामुळे आता बोलण्याची सोय राहील नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर (BJP) केली.
Web Title : Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President’s rule, claims Jayant Patil
हे देखील वाचा :
Baramati News | आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणारे बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्र
Prof Amita Bhide | शहरी दारिद्र्याचा बीमोड सामूहिक पातळीवरील प्रयत्नातून – प्रा.अमिता भिडे