बहुजननामा ऑनलाइन – जम्मू – काश्मीर चा कलम ३७० हटविल्यानंतर देशात शांततेचं वातावरण आहे. सध्या जम्मू – कश्मीर मध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. आज बकरी ईद असल्याने कलम १४४ मध्ये थोडी सूट देण्यात आली . तरी काश्मीर च्या घाटीत ईद शांततेत साजरी करण्यात आली. श्रीनगर चा हवाई दौरा करते वेळी तिथे शांतता दिसून आली. दरम्यान ईद च्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी जी सूट देण्यात आली होती , ती आता परत घेण्यात आली आहे.
ईदचे औचित्य साधून १४४ मध्ये काही सूट देण्यात आली होती. बँक तसेच बाजारपेठा देखील खुल्या करण्यात आल्या होत्या. लोकांनी मोठ्या संख्येने मज्जीद मध्ये जाऊन नमाज पठण केले. नमाज पठण करण्याची वेळ संपल्याने दिलेली सूट सुद्धा परत घेण्यात आली आहे. सोमवारी श्रीनगरचे डेव्हलोपमेंट कमिश्नर शाहिद चौधरी यांनी देखील हवाई पाहणी करत , परिसरातील परिस्थिती जाणून भेटली. जम्मू – काश्मीर पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणा प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी घाटीत मज्जीद मध्ये मोठ्या संख्येने गर्दी करण्यात आली. जम्मू -काश्मीर पोलिसांनी देखील मिठाई वाटप करत , ईद च्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
सुरक्षिततेच्या दृष्टीने अजूनही घाटी मध्ये मोबाईल , इंटरनेट , केबल सुविधा बंद आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गेल्या ६ दिवसांपासून घाटीमध्ये शांततेचं वातावरण आहे, तसेच एकही गोळी चालवण्यात आली नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील गेल्या आठवडाभरापासून घाटीमध्येच आहेत , ठिकठिकाणी जाऊन ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सोमवारी देखील त्यांनी पाहणी केली आणि श्रीनगर , सोपोर येथे जाऊन स्थानिक लोकांची भेट देखील घेतली. सोमवारी श्रीनगर, पहलगाम , अंनतनाग अश्या अनेक ठिकाणी बहुसंख्य लोकांनी मज्जीद मध्ये जाऊन नमाज पठण केले. बारामुला येथील मज्जीद मध्ये १० हजार लोकांनी नमाज पठण केले.
Srinagar today. #Kashmir pic.twitter.com/Oe1c9YyFfs
— Imtiyaz Hussain (@hussain_imtiyaz) August 10, 2019