नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने परदेशी नागरिकांना, अप्रवासी भारतीय आणि परदेशातून आलेल्या भारतीयांवर माता वैष्णो देवी यात्रा करण्यावर बंदी आणली आहे. श्राइन बोर्डाने रविवारी जारी केलेल्या एडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, देशभरातून आलेल्या कोणत्याही खोकला आणि सर्दीचा त्रास होत असेल तर यात्रेवर जाऊ नका.
एडव्हायजरीमध्ये परदेशी, अप्रवासी भारतीय आणि परदेशातून परतलेल्या भारतीयांना परदेशातून परतल्याच्या २८ दिवसांपर्यंत यात्रा करण्याचा उल्लेख आहे. श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी म्हटले कि रेल्वे स्टेशन कटडा, हेलीपॅड, निहारिक कॉम्प्लेक्समध्ये यात्री हेल्प डेस्क स्थापित केले आहे. प्रभावित देशातून येणाऱ्या यात्रींकडून फॉर्म भरून घेतले जात होते. त्यासह भाविकांना जागरूक करण्यासाठी कटरामध्ये प्रवासासंबंधी सूचनांचे फलकही लावण्यात आले आहेत. बोर्डाचे डॉक्टर स्टाफलाही प्रशिक्षण दिले असून बोर्डाच्या स्टाफ आणि भाविकांसाठी मास्क, ग्लोव्हस, सॅनिटायझर आणि इतर गरजेच्या सामान दिले जात आहे.
यावेळी माता वैष्णो देवीमध्ये ताराकोट, बाणगंगा, हेलीपॅडमध्ये भाविकांची थर्मल स्कॅनिंग केली जात असून बोर्डाच्या सगळ्या संस्थानांची साफ-सफाई नियमितपणे करण्याचे प्रयत्न होत आहेत. ही क्रिया दिवसातून चार वेळा केली जात आहे. रांगेत उभे राहणे, वेटिंग हॉल सारख्या ठिकाणी तसेच आरतीची जागा सॅनिटाईज केली जात आहे. जिल्हा आयुक्त रियासी इंदू कंवल चिब यांनी कोरोना व्हायरसबद्दल कटडामध्ये कलम १४४ लागू केले आहे. कटडामध्ये भंडारा, सार्वजनिक कार्यक्रम, जिम, मॉलवर ३१ मार्चपर्यंत बंदी आणली आहे. जिल्हा आयुक्तांनी सांगितले कि भाविकांना कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.