बहुजननामा ऑनलाईन टीम : पाकिस्तानकडून एलओसीजवळ सतत उल्लंघन होत असताना भारतीय सैन्याने दहा पाकिस्तानी सैनिकांना मारत चांगलेच उत्तर दिले आहे. पूंछमधील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील आणि मानकोटच्या गोळीबाराचे उत्तर भारताने पाकिस्तानला दिले आहे. सैन्याने केलेल्या हल्ल्यात पाकव्याप्त बटालमधील दोन पोस्ट उद्धवस्त केल्या असून अनेकांचे नुकसान झाले आहे. तसेच उरीमध्येही दोन पाकिस्तानी सैनिकांना मारले आहे.
शुक्रवारी सकाळी बटालमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अनेक रुग्णवाहिका सैनिकांचे मृतदेह घेऊन जाताना दिसल्याने सीमेपलीकडे मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या जास्त असू शकते, अशी माहिती सूत्रांनुसार सांगितली जात आहे. पाकिस्तानी सैन्याने बटालजवळ राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्याचे निर्देश दिले आहेत, कारण भारतीय सैन्याने कारवाई केल्यानंतरच्या नुकसानीची बातमी उघड होऊ नये. सैनिकांच्या सतत होणाऱ्या मृत्यूने वैतागून पाकिस्तानने दुपारनंतर राजौरीच्या नौशेरामध्ये गोळीबार केला.
चौक्यांसोबत रहिवाशी भागांना लक्ष करत कलाल व डींगमध्ये गोळीबार केला. झालेल्या गोळीबारामुळे डींगमधील बॅरेक्स आणि मशीनचे नुकसान झाले असून तिथल्या पहारेकऱ्यांनी जवळच्या बंकरमध्ये लपून आपला जीव वाचवला आहे. झालेल्या स्फोटांचा आवाज नौशेरापर्यंत पोहोचत होता. दुपारी एक ते अडीच पर्यंत हा गोळीबार चालू राहिला. तसेच सुंदरबनी मध्ये पाकिस्तानने तोफा डागल्या आहेत. सोबत सिलिकुट, हाथलंगा, मोथल, सोव्हरा, बालाकोट, चुरंदा आणि जवळच्या गावात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तेथील लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
Visit : bahujannama.com