नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा आणि अधिकार देणारे कलम ३७० सरकारने हटवले. या कलमामुळे राज्याला विशेष दर्जा मिळाल्याने मागील ७० वर्षांमध्ये तब्बल ४ लाख कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. तर या राज्याच्या सुरक्षेसाठी ३१ वर्षांमध्ये ६५०० सैनिकांनी आपला जीव गमावला आहे. केवळ कलम ३७० मुळे अन्य राज्यांच्या तुलनेत कित्येक पट खर्च जम्मू काश्मीरवर कसा झाला ते आम्ही सांगत आहोत.
जम्मू-कश्मीर च्या आर्थिक स्थिति बाबत बोलायचे तर केंद्र सरकारने मागील १६ वर्षांत प्रति काश्मिरी व्यक्तीवर ९२ हजार रुपये खर्च केले आहेत तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश मधील प्रत्येक व्यक्तीवर केलेला खर्च मात्र ४३ हजार रुपये इतका आहे. उत्तर प्रदेश ची लोकसंख्या मात्र देशाच्या १३ टक्के इतकी आहे.
या राज्यातील गरिबी मिटवण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड पैसे खर्च केला असून मिळालेल्या आकड्यांनुसार १९८० साली जम्मू-कश्मीर मधील २५ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली होती मात्र आता २० वर्षानंतर ती केवळ ३ टक्के इतकी आहे. १९९१-९२ मध्ये देशातील प्रतिव्यक्ती खर्च ५७६ रुपये होता तर जम्मू काश्मीरमध्ये तो ३ हजार १९७ रुपये इतका होता.
सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत बोलायचे झाले तर १९८८ ते २०१९ दरम्यान जम्मू-काश्मीर मधील झालेल्या चकमकींमध्ये ६५०० जवान शाहिद झाले आणि २३ हजार ६४० दहशतवादी मारले गेले. या वर्षांमध्ये येथे जवळपास ४७ हजार २३५ दहशतवादी हल्ले झाले.
तसेच भारतात राहून पाकिस्तान च्या समर्थनार्थ बोलणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेवर देखील १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यातील ९० टक्के खर्च केंद्र तर केवळ १० टक्के खर्च राज्यसरकार करत असे.
- ‘या’ पॉइंटवर फक्त ४५ सेंकद करा मसाज, होतील ७ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या
- ‘या’ ७ वनौषधी करतील मेंदूला ‘तल्लख’, जाणून घ्या कसे करायचे उपाय
- बेली फॅटमुळे हाडे होतात कमुकवत, याकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष ; जाणून घ्या
- स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
- तुम्हालासुध्दा माहिती नसेल, मुलांना ‘या’ ५ कारणांमुळे येतात पिंपल्स ; जाणून घ्या
- सावधान ! ‘या’ रोगांमुळे होऊ शकतो २४ तासांत मृत्यू, जाणून घ्या लक्षणे