बहुजननामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून सीमेपलीकडे पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराकडून दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आले. पाकिस्तानातून घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे, जम्मू कश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांसह एका हस्तकाला कंठस्नान घातल्या माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे.
#WATCH Jammu and Kashmir: 2 terrorists & 1 terrorist associate killed in an encounter with security forces at Goripora Area of Awantipora in Pulwama district. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/bY41lkwcFp
— ANI (@ANI) April 25, 2020
कोरोनाचा जगभरात फैलाव झालेला असतानाही पाकिस्तान नियंत्रण शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे, गेल्या काही आठवडयांपासून घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. भारत कोरोनाशी लढा देत असताना लष्करही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सशस्त्र दले देशाचे रक्षण करण्यासाठी सिद्ध आहेत, सशस्त्र दले कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत, भारताचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी देशाला आश्वस्त केले आहे.