बहुजननामा ऑनलाईन – राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याची चिंता व्यक्त करत त्यांनी गहलोत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यातील खुप ठिकाणी कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. ही बाब गंभीरतापुर्वक हाताळणे गरजेचे आहे.
मात्र काही कालावधीनंतर त्यांनी आपली बाजू संभाळत सरकार कायदा व सुव्यवस्थेबाबत पुर्णपणे गंभीर आहे. यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी नमुद केले. मिळालेल्या माहितीनुसार, धौलपुर आणि अलवरसारख्या गंभीर घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. अशा घटना घडू नये यासाठी सरकारने भविष्यात प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
काही दिवसांपुर्वी वसुंधरा राजे यांचा बंगला खाली करण्यासाठी गहलोत आणि पायलट यांनी केलेल्या वक्तव्यात विरोधाभास दिसत होता. यावर विरोधी पक्षाने उठविलेल्या प्रश्नांवर परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास पलटवार करत म्हणाले की, जेव्हा कटारिया गृहमंत्री होते तेव्हा एक आरोपीला झालावाडमध्ये घेऊन जाताना तीन पोलीस कर्मचारी मारले गेले होते. अशात भाजपला अशी भाषणबाजी शोभत नाही.